अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. त्यांना १६ व्या फेरी अखेरीस ५८ हजार मते मिळाली असून जवळपास १२ हजार लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळं याच मुद्द्यावरून माजी मंत्री अनिल परब यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. अंधेरीत भाजपनं उमेदवार मागे घेतला परंतु नोटाचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपनं त्यांचा उमेदवार मागे घेतल्यानंतर मी त्यांचे आभार मानले होते. परंतु त्यांनी ऋतुजा लटकेंप्रती सहानुभूती दाखवत अंधेरीत नोटाचा प्रचार केला. भाजपनं माघार घेऊन लटकेंना पाठिंबा देण्यात काहीही अडचण नव्हती. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केल्याचा आरोप परबांनी केला आहे.
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार
आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर




