टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्रात पावसाचे संकट अजूनही कायम, सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचे संकट सोमवारी असणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. कोकणात मॉन्सून सक्रीय झाला आहे. तब्बल बारा दिवस अगोदरच मान्सून पोहचला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होताच २४ तासांत कोकणात मान्सून पोहचला आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. रविवारी पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. राज्यातील पावसाचे संकट अजूनही कायम आहे. सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात मॉन्सून सक्रीय झाला आहे. तब्बल बारा दिवस अगोदरच मान्सून पोहचला आहे. कोकणात प्रचंड पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला आहे. भीमा आणि नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नीरा नदीतून सध्या 30,000 क्सूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर येथे भीमा नदीवर असलेला जुना ब्रिटीश कालीन पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.

मुंबईत रविवारी रात्रीपासून पाऊस सुरुच आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईच्या जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. पुढील दोन तास मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यांत सोमवारी पाऊस सुरु आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात प्रचंड पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. इंदापूरच्या शासकीय रुग्णालयात पाणी साचले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, बुलढाणा

विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. विदर्भात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काढणी करून ठेवलेल्या उन्हाळी मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाने ब्रेक घेतला आहे. नाशिक, जळगावात पावसाने विश्रांती घेतली आहे. मे महिन्यात राज्यात प्रथमच प्रचंड पाऊस झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Photos: पहिल्याच पावसाचं रौद्ररुप, पुण्यात काय नुकसान झालं ते पहा..

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS

माजंरी: बाजार संपवून गावाकडे परत निघालेल्या दोघांचा गंभीर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला

वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज

थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार

आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

Electricity Price Hike: मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा ‘शाॅक’; सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार