टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला

Rajendra Pawar : पंचमीला काच लावून मांजा केला पण पतंग व काटाकाटी तूच करायचा,लहानपण भराभर सरले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर आज पहिलीच जयंती आहे. बारामती येथे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं होतं. आज सकाळच्या सुमारास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित होते. त्याचबरोबर पवार परिवारातील सदस्यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले,   अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्येही अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या जयंती दिनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार (Rajendra Pawar)  यांनी अजितदादांच्या जयंती दिनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी त्या दोघांनी सोबत घालवलेलं बालपण, सुट्ट्या ते लाल दिव्यांची गाडी या सर्व गोष्टी तसेच रोहित पवारांना राजकारणात दिलेली शिकवण आणि साथ याबाबत देखील त्यांनी लिहलं आहे.(Rajendra Pawar) त्याचबरोबर त्यांचे आणि अजित पवारांचे लहानपणापासूनचे फोटो शेअर केले आहेत.

Rajendra Pawar Social Media Post: राजेंद्र पवार यांनी पोस्ट 

“२२ जुलै,आज तू ६७ वर्षे पूर्ण,म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. डोळ्यापुढून सारा काळ सरकतो.आपण ४-५ वर्षाचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवे,उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो.त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास.शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपटीवरच बसलो.जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता-म्हणता तू मंत्री झालास.आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थीविसर्जनही आठवते.बेंगलोरवरून ट्रकने गाई आणल्या,प्रवासात तू मी एकत्र होतो. पंचमीला काच लावून मांजा केला पण पतंग व काटाकाटी तूच करायचा,लहानपण भराभर सरले.”

“तू मोठा झाला,मंत्री झाला पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास. रोहीत दोन महिन्याचा होता,आपण एवढा लहान घेऊन तुझ्या हनिमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो.त्याच रोहितला पहिल्या इलेक्शनला तू सांभाळलेस.जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो तरी शेवट-शेवट त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी,एकत्र काम करण्याबद्दल जवळकीने बोललास.कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवठ खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास,आवडले ते मनापासून बोलणारा तू. तू आज नाहीस,१९६४ च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते,तसेच आज तुझ्या जाण्याने झालेय.तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय.तू नाहीस हे जरी सत्य असले तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो.मनापासून तुझी आठवण येतेय.तुझे अस्तित्व जाणवत राहते, “काय बंधू” म्हणून तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहते..राजेंद्र पवार”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now