आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगकृष रघुवंशीची विकेट चर्चेत आली आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात अशी विकेट पहिल्यांदाच दिली गेली.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. कोलकात्याची सुरूवात काही चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे आणि टिम सैफर्ट स्वस्तात बाद झाले. अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्याने संघावर दडपण वाढलं. अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांच्यावर जबाबदारी आली होती. या जोडीकडून केकेआरच्या चाहत्यांना फार अपेक्षा होती. या दोघांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 27 धावांवर असताना अघटीत घडलं. अंगकृष 8 चेंडू खेळून 9 धावांवर होता आणि त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याने बाद दिलं गेलं. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला अशा पद्धतीने बाद दिल्याने केकेआरच्या स्टाफने नाराजी व्यक्त केली. अभिषेक नायर यांनी चौथ्या पंचांसोबत वाद घातला. पण त्याला बाद दिल्याने मैदान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.
आयपीएल स्पर्धेच्या या सामन्यात लखनौकडून पाचवं षटक टाकण्यासाठी प्रिन्स यादव आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीला स्ट्राईक मिळाली होती. त्याने प्रिंस यादवचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने मारला आणि धाव घेण्यासाठी पुढे गेला. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या कॅमरून ग्रीनने त्याला नकार दिला. त्यामुळे अर्ध्यातून परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. स्ट्राईकला परत जाताना त्याने उडी मारली. पण परत असताना त्याच्या अंगाला चेंडू लागला आणि अडला. त्यानंतर मोहम्मद शमीने अपील केली. त्यामुळे मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे या अपीलसाठी दाद मागितली. त्याची कृती रिप्लेत पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांना त्याने धावताना दिशा बदलल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांनी अंगकृषला बाद दिलं. त्यामुळे त्याही धक्का बसला. अशा पद्धतीने बाद दिल्याने केकेआरच्या संघाने नाराजी व्यक्त केली.
आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विकेट झटपट पडल्याने दबाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम धावगतीवर झाला. पावरप्लेच्या सहा षटकात 3 गडी गमवून 31 धावा करता आल्या. निर्णयानंतर रघुवंशी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याच्या कृतीने संतापल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्याने आपले हेल्मेट फेकून दिले आणि सीमारेषेवर बॅटही फिरवली. अंगकृष रघुवंशीचा डाव 9 धावांवर संपुष्टात आला.















