आमदार बाबासाहेब देशमुख यांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला : नुकतेच विधानसभेचे अर्थसंक्लपीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी मतदार संघाबरोबरीने राज्यातील महत्वपुर्ण प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधुन घेतले. तर काही महत्वाचे प्रश्नांची सोडवणुक करुन घेतली त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील बोगस डॉक्टराची संख्या वाढत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिले.आशा बोगस डॉक्टरांमुळे अनेक नागरीकांचे जिव धोक्यात येत आहेत. तरी आशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली.

त्या प्रश्नावर उत्तर देताना वैद्यकिय शालेय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी उत्तरादाखल सांगितले की, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, नगरपालीका व महानगर पालीका स्तरावर जिल्हाधिकारी ,गटविकास अधिकारी,मुख्याधीकारी व मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली यापुर्वीच आशा बोगस डॉकटरांची शोध समीती गठीत केलेली आहे.आशा डॉक्टरावरती कारवाई करण्यासाठीं जिल्हा दंडाधीकारी या़च्या आध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समीती गठीत केलेली आहे.. या समितीमार्फत आशा बोगस डॉक्टरावर कारवाई करण्यात येईल.आसे मंत्री महोदयांनी सांगीतले.
राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसले बाबत…. सरकारने एक राज्य एक गणवेश या योजने अंतर्गत शैक्षणीक वर्षात केंद्रीकृत पध्दतीने गणवेश दिले जातात.या गणवेश वाटपामध्ये अनेक तृटी आहेत. गणवेशाचा निकृष्ट दर्जा, एकाच ़कंत्राट दाराला ठेका देणे, एकाच टेलरची निवड करणे,कमी जास्त मोज माप, गणवेश वेळेवर न मिळणे व काही भागातील विद्यार्थी गणवेशापासुन वंचीत असुन आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थी तर फाटके कपडे घालुन शाळेत येतात.या सर्व बाबींचा विचार करुन सरकारने उपाययोजना कराव्यात.

या प्रश्नावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, शालेय विद्यार्थांना दिले जाणारे दोन गणवेशा पैकी एक गणवेश महिला अर्थीक विकास महामंडळा मार्फत तर दुसरा गणवेश हा स्थानिक शालेय शिक्षण समीतीमार्फत देण्याचा निर्णय झालेला आहे. 44,60,004 इतक्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो आहे.गणवेशाच्या बाबतच्या तृटी असतील तर त्याची सखोल चौकशी करुन सर्व विद्यार्थ्यांना चांगले गणवेश ते ही वेळेत दिले जातील असे सभागृहाला सांगीतले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जवळ पास दोन लाख कर्मचारी, स्वयंपाकी व मदतनिस असुन त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असुन त्यांना देण्यात येणार्‍या मानधनामध्ये देण्यात यावी तसा निर्णय 28 जुलै 2024 च्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेला आहे तरी सरकारने यावर काय उपाययोजना केल्या आसा प्रश्न आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला… त्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री महोदय दादा भुसे म्हणाले की..या कर्मचार्‍यांचे मानधन हे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे ठरवण्यात येते.केंद्राचे 600 रुपये व राज्याचे 400 रुपये व अधिकचे राज्याचे 1500 रुपये आसे आपण 2500 रुपये देत आहोत हे मानधन पहाता या कर्मचार्‍यांना मानधनात वाढ करण्याची मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करेल व कर्मचार्‍यांना दिलासा दिला जाईल.

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दुध उत्पादकांच्या बाबतचा महत्त्वपुर्ण प्रश्न विचारत राज्यात दुध उत्पादकांची संख्या मोठी असुन,दुधाचे घसरलेले दर यांचा विचार करुन राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देते व राज्यसरकारने आणखीन 2 रुपयाची अनुदानात वाढ केल्याची घोषणा केली आहे,हे अनुदान कित्येक शेतकर्‍यांना आजही वेळेत मिळत नाही. व काहींना आजुन मिळण्यास अडचणी येत आहेत.
या प्रश्नावरती बोलताना मंत्री महोदयांनी सांगीतले की,दुधाला मिळणारे अनुदान हे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असुन दुधाचे कोसळलेले दर पहाता वाढीव 2 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे..ज्या दुध उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान मिळत नसेल त्यांनी आपले आधार कार्ड ,संघाचे बँक खाते नाव,पशुधन टॅग क्रमांक अशी अचुक माहिती भरावी अशी माहीती भरल्यास अनुदान मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही.ज्या दुध उत्पादकांची माहीती पुर्ण आहे..आशा दुध उत्पादक शेतकर्‍याऩी संघामार्फत सर्व माहीती भरुन घेण्याच्या सुचना संघाला देण्यात आल्या आहेत.
तसेच सांगोला,पंढरपुर,मंगळवेढा व सोलापुर जिल्ह्यातील सामाजीक वनीकरण विभागातील तात्कालीन अधिकारी यांनी 109 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड होणे,33 कोटी वृक्षलागडीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सोलापुर जिल्ह्यातील सांगोला ,पंढरपुर, मंगळवेढा या तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे त्याचे संगोपन न करता खाजगी वन रक्षक व इतरांच्या नावे खोटी बिले काढण्यात आली आहेत आशा अधिकार्‍यांना व संबंधितांवरती काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला.

 

त्यास उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनी सांगीतले तात्कालीन वनक्षेत्रपाल यांना निलंबित केले असुन इ 10 पैकी 3 अधिकार्‍यांचे चौकशी अहवाल पुणे विभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाले असुन,ईतर 7 अधिकारी कर्मचारी यांचेही चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे जाहीर केले.
आशा प्रकारे अनेक प्रश्न आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केले त्यामध्ये सांगोला तालुक्यातील कडलास हद्दीतील माण नदीजवळ इंदापुर-विजापुर 965 जी या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत ते काम तबडतोड पुर्ण करावे.. राज्यातील वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण काढण्यात यावे व अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी…तसेच राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत सापडलेला असुन, कापसाचे घटलेले उत्पादन व बाजारातील घटलेल्या सुताच्या किंमती यामुळे सुतगीरण्या अडचणीत सापडल्या आहेत याचा विचार करुन सुतगिरण्यांना अर्थीक मदत करावी, अशीही मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली.

तसेच भारतीय संविधानाचा गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर संविधानाचे भारतीय नागरीकाप्रती महत्व व संविधान हे भारतीयांचा आत्मा कसा आहे हे योग्य प्रकारे सभागृहात मांडले तसेच सांगोला शहरात विश्वरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घघाटनाचे निमंत्रण सभागृहातच मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्य मंत्री मा. एकनाथजी शिंदे , दुसरे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व मंत्री मंडळातील सदस्यांना व आमदारांना सभागृहातच निमंत्रण दिले तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर ,महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणीही सभागृहात केली. ासे विविध विषय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात मांडुन सभागृहात सांगोल्याचा आवाज पुंन्हा एकदा घुमला असल्याची माहीती शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

https://mls.org.in/

आणखी वाचा

सांगोला विद्यामंदिरची संस्कृती लोंढे वक्तृत्वमध्ये राज्यात प्रथम

सांगोला येथे महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन; ना.राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon