Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रा काळात दर्शनाला तासनतास थांबावे लागत असल्याने अनेक भाविक सध्या पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत.
1/8

आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले सात मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्या तशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.
2/8

काल देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले असताना देवाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेली असून दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत.
3/8

आषाढी यात्रा काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने झटपट दर्शनासाठी सुरू केलेले टोकन दर्शन व्यवस्था यात्रा कालावधीपर्यंत बंद करण्यात आलेली आहे.
4/8

यात्रा काळात दर्शनाला तासनतास थांबावे लागत असल्याने अनेक भाविक सध्या पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत.
5/8

यामुळेच जरी आषाढी एकादशी 6जुलैला असली तरी विठ्ठलाच्या दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक थांबलेले दिसत आहेत.
6/8

प्रशासनाने या ठिकाणी भाविकांना विशाल वॉटरप्रूफ मंडप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह उभारलेले असल्याने भाविकांना दर्शन रांगेत थांबणे सुसह्य होत आहे.
7/8

यासोबत भाविकांच्या निवासासाठी असणाऱ्या 65 एकर येथील भक्ती सागर या निवास स्थळावर आगाऊ जागेच्या बुकिंगसाठी ही विविध दिंडी यांची प्रतिनिधी पुढे आलेली आहेत.
8/8

मंडळी ही आधीच विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या दिंडीत आणि पालखी सोहळ्यात परत जात आहेत.