Sunday, September 8, 2024
Homecrimeवारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले : सात जणांचा मृत्यू

वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले : सात जणांचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला असून दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले. या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच जखमींना जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
राज्यातील वारकरी पंढरीच्या दिशेने पायी निघाले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारकरी पायी पंढरपूरला जात असतात.
यामध्ये अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. परंतु या वारकाऱ्यांवर काळाने घाला घातला. दिंडी सांगोला तालुक्यात जुनोनी गावाजवळ पोहोचली होती. परंतु या दिंडीमध्ये भरधाव कार घुसली आणि ७ जणांचा बळी गेला. 
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments