मेलबर्न मैदानावर पार पडलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना भारताने 70 धावांनी आपल्या नावावर केला. आता भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध गुरुवारी दोन हात करेल.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या होत्या.
सूर्यकुमार यादवच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेपुढे १८७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. भारताचे १८७ धावांचे आव्हान पार करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. झिम्बाब्वे संघाचा डाव 117 धावांवर संपुष्टात आला.
संबंधित बातम्या
हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल
सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला आणखी किती शतके हवी आहेत?
RBI Repo Rate: आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा EMI कमी होणार
मोबाईल चार्जरवर दिलेल्या ‘या’ अंकांचा नेमका अर्थ काय, तुम्ही वापरत असलेला चार्जर खरंच सुरक्षित आहे का?
तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…




