टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तिला व्हायचं होतं पोलीस, पण फक्त 2 मार्क…20 वर्षीय तरुणीने उचचलं टोकाचं पाऊल; महाराष्ट्रात हळहळ!

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एक दुखद घटना घडली आहे. येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत फक्त दोन गुण कमी मिळाल्याने एका 20 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संवली आहे. ही घटना समोर येताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु राज्यातील हजारो तरुणांना वेगवेगळ्या कारणांमुळे यश हुलकावणी घालते.

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु राज्यातील हजारो तरुणांना वेगवेगळ्या कारणांमुळे यश हुलकावणी घालते.

1 / 5
अशाच एका अपयशाची हृदयद्रावक आणि हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली असून येथे एका तरुणीने पोलीस भरतीच्या परीक्षेत दोन गुण कमी पडले म्हणून जीवन संपवले आहे.

अशाच एका अपयशाची हृदयद्रावक आणि हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली असून येथे एका तरुणीने पोलीस भरतीच्या परीक्षेत दोन गुण कमी पडले म्हणून जीवन संपवले आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली आहे. येथे प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय 20) ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते. तिने यावेळी पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली आहे. येथे प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय 20) ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते. तिने यावेळी पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती.

3 / 5
परंतु तिला या भरतीमध्ये 2 गुणांनी अपयश आले. हेच अपयश न पचल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने उभाडे गावात राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.  पोलीस भरतीचे मेरिट 127 गुणांवर बंद झाले. तर प्रतीक्षाला 125 गुण मिळाले होते.

परंतु तिला या भरतीमध्ये 2 गुणांनी अपयश आले. हेच अपयश न पचल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने उभाडे गावात राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पोलीस भरतीचे मेरिट 127 गुणांवर बंद झाले. तर प्रतीक्षाला 125 गुण मिळाले होते.

4 / 5
 अवघ्या 2 गुणांनी तिचे वर्दीचे स्वप्न भंग झाले. त्यामुळे अपयशामुळे मानसिक तणाव आणि नैराश्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास चालू केला आहे. ही घटना समोर येताच महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवघ्या 2 गुणांनी तिचे वर्दीचे स्वप्न भंग झाले. त्यामुळे अपयशामुळे मानसिक तणाव आणि नैराश्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास चालू केला आहे. ही घटना समोर येताच महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now