टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला

Follow Us:

स्थानिक स्वराज आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयोगाला भेट देऊन पारदर्शक निवडणुकीची मागणी केली. “मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray on Election Commission: आगामी स्थानिक स्वराज संस्था तसेच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Election 2025) महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून (Mahavikas Aghadi Delegation) सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली. मतदारयादी कशासाठी लपवताय? मतदार नोंदणी (Voter Registration Maharashtra) बंद करून ही लपवाछपवी का करताय अशी विचारणा राज यांनी केली. यावेळी काही प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखाने कसे पडले? हे कसे शक्य असल्याचे विचारताच आयोगाच्या अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात आली.

आमचं तुमचं करत बसू नका

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आयोगाला चांगलं सुनावलं. ते म्हणाले की आमचं तुमचं करत बसू नका आमच्यासाठी निवडणूक आहे एकच आहे. जोपर्यंत राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही, असे म्हणत त्यांनी आयोगाला टोला लगावला. मतदान नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करत आहात? निवडणुका राजकीय पक्ष लढवतात, तर राजकीय पक्षांना शेवटची मतदारयादी का दाखवली जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली.

डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका

दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आयोगाची झाडाझडती घेतली. जर त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. चोक्कलिंगम म्हणाले, काही जबाबदारी आमच्याकडे नाही म्हणते, राज्य निवडणूक आयुक्त आमच्याकडे काही जबाबदारी आमच्याकडे नाही म्हणते, मग आम्ही कोणाशी बोलू? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आयोगाला सवाल केले. ते म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झालेलं नाही आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत, त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती