टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Board SSC Result 2025: यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार; मुलींच्या निकालाची टक्केवारी जास्त

Maharashtra Board 10th (SSC) Result 2025: पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून 15 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून 15 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. या वर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. यंदा मुलींच्या उत्तीर्णचे टक्केवारी 96.14 टक्के आहे. मुलांची टक्केवारी 92.31 आहे. म्हणजे मुलींचा निकाल 3.83 टक्के जास्त आहे.

असा आहे निकाल

माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीसाठी ६२ विषयांसाठी घेतली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाची माहिती माध्यमांना दिली.

  • विशेष प्राविण्य- नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५ टक्के पेक्षा अधिक गुण या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
  • प्रथम श्रेणी – दहावीत प्रथम श्रेणीत ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक टक्केवारी आणि ७५ टक्केपेक्षा कमी गुण या श्रेणीतील विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
  • द्वितीय श्रेणी- दहावीच्या परीक्षेत द्वितीय श्रेणी मिळवणारे ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत.
  • तृतीय श्रेणी- तृतीय श्रेणीत १ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण आहे. ३५ टक्क्याहून अधिक आणि ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण या श्रेणीत येतात.

२११ जणांना १०० टक्के

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी २११ आहेत. त्यात शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत. लातूरच्या ११३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहे. पुण्यातील  १३ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २,  कोकण ९ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now