इराण आणि अमेरिका संघर्ष पेटला आहे. मात्र, या युद्धाची झळ जगातील सर्वच देशांना बसत आहे. यादरम्यानच भारताच्या उंबरठ्यावर मोठं संकट निर्माण झालं. भारत होर्मुज खाडीतून मार्ग काढत असताना ज्याची भीती तेच पाऊस इराणकडून उचलण्यात आले.

मुळात म्हणजे इराण आणि अमेरिका युद्ध हिंद महासागरात पोहोचले आहे. डिएगो गार्सियासह अनेक लष्कर तळांवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणने केलेल्या या हल्ल्यात कोणी ठार झाले नाही पण नुकसान अधिक झाले. यामुळे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता आहे. इराणच्या या निर्णयामुळे युद्धाची आग आणखी भडकण्याचा धोका आहे. हिंद महासागर क्षेत्रही प्रभावित झाले तर त्याचा सामना करणे भारतासाठी आणखी एक मोठे आव्हान नक्कीच असणार आहे.
होर्मुज खाडीत अगोदरच भयंकर अशांतता आहे. जर ही अशांतता हिंद महासागरात पोहोचली तर ही भारतासाठी अत्यंत धोकादायक घंटा नक्कीच ठरू शकते. इतर उत्पादनांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हिंद महासागर हे भारतासाठी एक जलद्वार आहे त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे संघर्ष नको आहे. अगोदरच होर्मुज खाडीतून मार्ग काढता काढता भारताला नाकीनऊ आलेत, त्यामध्ये हा हल्ला म्हणजे भारताचे टेन्शन वाढवणारा नक्कीच ठरू शकतो.
हे सुद्धा वाचा
Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सकडून नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT…










