टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, 20 एप्रिल रोजी नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब?

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा २० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राजकारण युती आणि आघाडीवर सुरु झाले आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती होती. त्यानंतर त्या युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर महायुती झाली. महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. आता राज्यातील तीन बडे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर एकत्र येत आहे. त्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावर येत्या २० एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा २० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत.

राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून झाली आहे. हे तिन्ही नेते एकत्र येत मोठा निर्णय घेणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यासाठी त्यांनी फुले वाड्यात येण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. यामुळे २० एप्रिल रोजी राज्याच्या राजकारणाचे लक्ष फुले वाडा राहणार आहे.

आणखी वाचा

MI vs SRH Pitch Report : वानखेडेत धावांचा महापूर येणार की गोलंदाज वरचढ ठरणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय

अखेर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर ऑनलाईन तक्रार दाखल 

Congress on Parth Pawar: वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूंनतरही… काँग्रेसची पार्थ पवारांवर विखारी टीका, आजोबांनी कान टोचल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा हल्लाबोल

आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र

गुड न्यूज, लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना, मोठी घोषणा, किती पैसै मिळणार?

बारामती निवडणुकीत शरद पवारांचा उमेदवार देणार का? शशिकांत शिंदेंनी मांडलं थेट गणितच, पवारांसोबत बैठकीनंतर काय निर्णय?