केरळ जिल्ह्यातील वायनाडमध्ये भूस्खलनाची मोठी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. भूस्खलनाची घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने बचावकार्य केले.

Wayanad Landslide : सध्या संपूर्ण देशात पावसाचा हाहा:कार झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले आहे. पावसाने घातलेल्या या थैमानामुळे सगळेच हतबल झाले आहेत. प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असली तरीही विध्वंस टाळता येत नाही. दरम्यान, सध्या पावसाच्या रौद्ररुपामुळे एक मोठे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाचा व्हिडीओ सध्या समोर आसून भूस्खळनाची घटना पाहून सर्वांनाच हादरा बसला आहे.
दुर्घटनेमुळे दोघांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील वायनाड येथे टनेल बनवण्याच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. त्या भागात चक्क भुस्खलन झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोघांचा मृत्यू झाला असून सहा मजूर जखमी झाले आहेत. वायनाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. ही घटना समोर आल्यानंतर लोकांना 2024 रोजीच्या दुर्घटनेची आठवण होत आहे. त्या दुर्घटनेत 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. सध्याची भूस्खलनाची ताजी घटना ही मीनाश्री ब्रिजजवळ डली आहे. याच भागात अनाक्कमपॉयल-कल्लाडी-मेप्पाडी ट्विन टनल प्रोजेक्टचे काम चालू आहे. या प्रकल्पांतर्गत मलप्पुरम आणइ वायनाड जिल्ह्यांना जोडले जाणार आहे.
याआधीही भूस्खलनाची घटना
वायनाडमध्ये ज्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे त्याच भागात याआधीही अशी घटना घडलेली होती. 2024 साली झालेली भूस्खलनाची घटना ही सर्वात विध्वंसक होती. सध्याची भूस्खलनाची घटना समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ मदतकार्य केले. घटना घडल्यानंतर कल्पेट्टा येथून अग्निशामक दलाचे जवान तसेच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. घटना घडल्यानंतर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सनेही बचावकार्यात सहभाग नोंदवला. दरम्यान सध्या घडलेली ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, असे म्हटले जात आहे. वैज्ञानिक पद्धतीने खोदकाम न केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे, अशी टीका केली जात आहे.
















