अखेर शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला. कृषी मंत्र्यांनी नुकताच कर्जमाफीबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देऊन 36 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सरकारकडून हे मोठे गिफ्ट म्हणावे लागेल.

बळीराजासाठी दिलासा मिळाला आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा केली आहे. हा सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दत्तात्रय भरणे यांनी बोलताना म्हटले की, शेतकऱ्यांना सांगतो 12 जून ते 15 जून पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी. मराठवाडा, खानदेश भागात सर्वदुर पाऊस पडणार नाही. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. मे आणि जूनमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. जळगाव, अमरावती, बुलढाणा या भागात पिकाचे अधिक नुकसान झाले. 24 जिल्ह्यांना पाऊसाचा फटका बसलाय. 1लाख 40 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. घराचे देखील नुकसान झाले. सगळे पंचनामे करा अस आदेश दिले आहेत म्हणजे लवकरात लवकर मदत करता येईल.
पुढे युरिया खताबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, आपल्याकडे स्टॉक आहे, युद्धामुळे थोडी अडचण आहे, केंद्रीय कृषी मंत्री यांना विनंती केलीये. शेतकऱ्यांना वाटतेय पेट्रोल डिझेलच झाले तस खाताचे होऊ नये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. 36 हजार 585 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार असल्याचा अंदाज आहे.

अटींमध्ये सुधारणा करण्याचे गरजेचे आहे ते केल्या जातील. सरकार अडचणीत असून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चांगला निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांच्या हमी भाव मागणीबाबत आम्ही सहमत आहोत. भुजबळांच्या नाराजीवर बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, या बाबतीत सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतलाय तो योग्य असेल भुजबळ जेष्ठ नेते आहे, मात्र सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ लढवय्या नेते आहेत.
रोहित पवार यांच्या ट्विटवर बोलताना त्यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यात जे नुकसान झाले त्याची पाहणी स्वतः रक्षा खडसे आणि स्थानिक नेते करत आहेत. बारामती किशोर मासाळ नगरसेवक याबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, मला याची माहिती नाही, मात्र त्यांनी माफी मागितलेल मी पाहिलं.













