३ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. टी-20 मालिकेतून वरिष्ठांना विश्रांती मिळाली आहे.
हा संघ निवडताना धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. वनडेच्या उपकर्णधारपदावरून के.एल. राहुलला हटवण्यात आले आहे. वनडे आणि टी-20 दोन्ही संघात ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. के.एल. राहुल संघातील जागा टिकवण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, त्याचे वनडेचे उपकर्णधारपद गेले आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएलची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता त्याचे हे डिमोशन आहे.
संबंधित बातम्या
विकासकामांना स्पीड ब्रेकर नकोत; पाणी, रस्त्यांसह विकास कामांसाठी महायुतीच पाहिजे –ना.जयकुमार गोरे
तेरावा झाल्यानंतरच राजकीय चर्चा, रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अन् व्हायरल व्हिडिओबाबत मांडली भूमिका
जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!
Devendra Fadnavis: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय; अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द
Income Tax : नवा आयकर कायदा 1 एप्रिल पासून लागू होणार, आयकरासंदर्भात अर्थसंकल्पातील 10 मोठ्या, जाणून घ्या




