आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने राजेवाडीचे‌‌ पाणी येणार….प्रशासन लागले कामाला

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला –

पंढरपुर दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आले आसता लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलावात‌ पाणी सोडण्याची मागणी केली होती, त्या वेळेस मुख्यमंत्री यांनी आमदार‌ बाबासाहेबांना तीन चार‌ दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री मा.जयकुमार गोरे व आमदार‌ गोपीचंद पडळकर  यांच्या समक्ष शब्द दिलेला होता.

सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी कटफळ येथे कॅनाॅल साफ करण्याचे व वेगवेगळ्या तोट्या बंद करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आसुन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मा.मुख्यमंत्र्यांना केलेली मागणी पुर्णत्वास येत असुन ..आमदार बाबासाहेब‌ देशमुख यांनी शनीवारी आमावस्ये दिवशी कटफळ येथील संत बाळु मामांच्या पवित्र मंदिरात उभे राहुन सांगीतले होते की, राजेवाडीचे पाणी येणारच आहे तसा मला मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. आणि तो दिलेला शब्द आज खरा होताना दिसत आहे.

पाणी येण्याच्या पुर्व‌ प्रक्रियेला प्रशासना कडुन सुरुवात झालेली असुन कटफळ भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाणी येण्याचा आनंद दिसत असून, शेतकरी वर्ग आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक करताना दिसत असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon