टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

विधान परिषद जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? भाजपलाच सर्वाधिक जागा? एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे संकेत

Eknath Shinde- Ravindra Chavan-Chandrashekhar Bawankule: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये आज खलबतं झाली. महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Local Body Legislative Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीत जागा पदरात पाडून घेण्यासाठी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्राथमिक बोलणीत एकूण १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर चर्चा झाली. तर शिवसेनेने अधिक जागांवर दावा सांगितल्याने आज भाजप आणि शिवसेनेत खलबतं झाली. आज सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी, नंदनवन येथे पोहचले. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महायुती १७ ही जागा जिंकणार असल्याचा दावा केला.

काय म्हणाले बावनकुळे?

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीची माहिती दिली. महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून चर्चा करतील. १७ जागेवर महायुती जिंकेल आणि मोठा विजय होईल. जवळपास ९९ टक्के मुद्दांवर एकमत झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून उर्वरीत मुद्दावर चर्चा करतील. एक दोन विषय राहिले आहेत त्यावर तिघे अंतिम चर्चा करतील.

जागा वाटपाचा काय असेल फॉर्म्युला?

सध्या जे सिटिंग आहे, त्यांना ती जागा द्यावी आणि नंतर संख्याबळाचा विचार करतो. ज्याचे संख्याबळ अधिक आहे, त्याचा विचार करतो. विधानसभा, लोकसभेवेळी चर्चा करताना हाच फॉर्म्युला होता. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्याकडे नेली आहे. आता शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत पूर्ण होईल. त्यामुळे भाजप या निवडणुकीत जास्त जागांवर लढण्याची शक्यता आहे.

स्वामित्व योजना-प्रॉप्रटी कार्ड मिळणार

गावठाणात प्रत्येक घरांचा भूमिअभिलेख प्रमाणपत्र द्यायचे आहे. नमूना ८ कधी मिळेल अशी प्रतिक्षा गावकर्‍यांची असायची. अशात हा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करत निर्णय झाला आहे. हा महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामुळे गावातील लोकांना पण प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

पेट्रोल डिझेल टंचाई

खासगीत विरोधक एकमत व्यक्त करतात, पार्टी म्हणून त्यांना भूमिका घ्यावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाया करण्याच्या सूचना आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांना डिझेल लागते अशा प्रश्न आहे. सर्वांना काटकसर करावी लागणार आहे, सर्वांना आपलं जीवन यामुळे जगता येईल. काही दिवसांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे, लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी