टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम! ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Updates: हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ जून ते २ जुलै या काळात महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय होऊ शकतो.

Maharashtra Rain Updates: १८ जून ते २ जुलै दरम्यानमान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार-पाच दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार व दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर  १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.(Maharashtra Rain Updates)

प्रशांत महासागरात अतिशय तीव्र ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय झाला असून, तो 1950 नंतरचा सर्वात भीषण ठरण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवली आहे. याचा थेट व विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर होत असून, पावसाचे प्रमाण कमी होणे व दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. मान्सून महाराष्ट्रात वेळेवर पुढे सरकण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) एल निनो सक्रिय झाल्याला दुजोरा दिला आहे. यंदा देशात सरासरीच्या सुमारे 90 टक्के इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain In Maharashtra Mumbai Updates)

प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट  १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Updates: मान्सूनच्या वाटेत नवे संकट? 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय, एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Maharashtra Rain Updates: जुनचा अर्धा महिना सरला, शेतकऱ्यांची धाकधुक वाढली..

जून महिन्याचा अर्धा टप्पा संपला, पण अद्यापही अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. खरीप हंगामाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत  खरेदी करून शेतीची तयारी पूर्ण केली आहे, मात्र आभाळाकडे लागलेले डोळे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज ढगांची चाहूल लागते, पण पावसाचे थेंब मात्र जमिनीवर पडत नाहीत. पेरणीची योग्य वेळ हातातून निसटत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा असलेला खरीप हंगाम आता पावसावरच अवलंबून असून, शिवारात शांतता आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..

Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु

ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..

Gold Price Today : सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..

रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

MSRTC NCMC Card : मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, प्रताप सरनाईक यांची घोषणा