टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर

मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या (Rain) सरी बरसल्याचं दिसून येत आहे. त्यातच, एकनाथ शिंदे हे मुरबाड येथे गेले असता, त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) वादळी वाऱ्यात अकडले होते, सुदैवाने पायलटच्या प्रसंगधावनतेमुळे ते सुखरुप जुहू येथील हेलिपॅडवर लँड करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण मुरबाड येथे लग्नासाठी जाताना शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात फसले होते. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत वादळातून हॅलिकॉप्टर बाहेर काढले. मुरबाडमध्ये अचानक सुरू झालेला पाऊस आणि वादळामुळे एकनाथ शिंदेंनी पुढील प्रवास टाळल्याची माहिती आहे. हॅलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हॅलिपॅडवर उतरवण्यात आले, शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सर्वजण सुखरुप आहेत.

बापगाव हेलिपॅडवरील बंदोबस्त हटवला

कल्याण मध्ये एका लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बापगाव परिसरातील हेलिपॅडवर उतरणार होते. मात्र, अचानक आलेल्या वावटळीमुळे अवकाशात दृश्यमानता वाढली होती. त्यामुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जुहू येथे इमर्जनशी लँडिंग केल्याची माहिती मिळाली आहे. बापगाव हेलिपॅड येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तो आता हटवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला तीन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघातनंतर संबंधित विमान कंपनीच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, व्हिआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हवाई वाहतुकीसंदर्भाने सुरक्षेसाठी ठोस उपाय करण्याची मागणीही व्यक्त होत आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी