टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत स्पष्टच बोलले, म्हणाले, बारामती..

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. सुनेत्रा पवार या निवडणुकीत मैदानात आहेत. निवडणूक बिनविरोध कशी करता येईल, याकरिता प्रयत्न सुरू आहेत. नुकताच उदय सामंत यांनी शरद पवारांनी भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

मोठी बातमी! शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत स्पष्टच बोलले, म्हणाले, बारामती..

उदय सावंत यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर सकाळीच सामंत शरद पवारांच्या भेटीकरिता पोहोचले. या भेटीनंतर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची मी भेट घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि माझी भेट झाली नव्हती. शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, ही एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे. आता काँग्रेस कशा पद्धतीने पुढे जाते आणि मागे यावर संजय राऊत बोलले आहेत. यावर मला काही जास्त बोलायचे नाही. पण अजित पवार यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्येही काम केले, काँग्रेससोबत काम केले. राजकारणापेक्षा जर व्यक्ती आपल्यामध्ये नसेल तर त्याठिकाणी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील तर ती बिनविरोध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, अशाप्रकारचे राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे, तो पुढे घेऊन गेला पाहिजे. महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले एक वेगळे राज्य आहे, अशा प्रकारचा संदेश पूर्ण देशभरात जाईल. अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, जर अंजली दमानिया यांच्याकडून सीडीआर पोहोचला असता तर त्यांनी पूर्ण कॉपी दिली असती त्याची.

जेडब्लू मॅरेडच्या हॉटेलच्या लेटवर इंग्रजीमधून लिहिलेल्या काही गोष्टी आहेत. त्यात दमानिया यांनीही खुलासा केला आहे की, अनोळखी व्यक्तीने हे त्यांच्याकडे दिलेले आहे. मी कालही सांगितले की, अशा आरोप प्रत्यारोपामुळे एकनाथ शिंदे यांचे काम काही कमी होणार नाही. उलट जनतेला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे भावतात, त्यामध्ये वाढच होईल. कारण एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकीय मोठे होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचे काम होत असेल तर ते देखील चुकीचे आहे.

ही भावना महाराष्ट्राच्या जनतेच्या वाढीस लागणार आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली. पत्रकार परिषद कोणी घेतली? पत्रकार परिषदेमध्ये कोणी कागदपत्रे दिली, यासर्व गोष्टींची चाैकशी व्हायला हवे, त्यामुळे सर्वकाही बाहेर येईल. मुद्दा असा आहे की, एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलण्यापेक्षा या प्रकरणात संपूर्ण चाैकशी झाली पाहिजे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधान परिषद जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? भाजपलाच सर्वाधिक जागा? एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे संकेत

Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश

Raju Shetti Sadabhau Khot : राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत यांची ‘चाय पे चर्चा’, ऊसदर आंदोलनाचं निमित्त, एकाच टेबलवर गप्पाचा फड

Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय

100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी

NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता