अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आदेश, उमेदवारांना…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. ज्यामध्येच 5 जणांचे निधन झाले. आता नुकताच अत्यंत मोठे आदेश पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आदेश, उमेदवारांना...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला अजित पवार विमानाने निघाले. विमान बारामती विमान तळावर लॅंन्ड होण्याच्या तयारीत असताना अगदी धावपट्टीच्या शेजारी विमानाचा मोठा अपघात झाला. ज्यामुळे अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धावपट्टीकडे जात असताना विमान अचानक एका बाजूला कोलमडले आणि थेट शेतात पडले. मोठा स्फोट विमानाचा झाला. अजित पवार यांचे निधन झाले आणि आज ते आपल्यात नाहीत, यावर विश्वास करणे सर्वांसाठीच कठीण आहे. अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांवरच नाही तर राज्यावर दु:ख कोसळले. काल बारामतीसह राज्यात शोककळा होती. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झाली.

महापालिका निवडणुका अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या पक्षासोबत लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना म्हणावे तसे यश महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. यामुळे अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल 4 सभा बारामतीत होत्या. मात्र, त्यापूर्वीच विमान अपघात झाला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत,  उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आली. हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon