टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शेतकरी कर्जमाफी: २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली ‘ही’ अट!

शेतकरी कर्जमाफी योजना २०२६

Devendra Fadnavis on Loan Waiver: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis on Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सरकार कर्जमाफी योजना राबवणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. याशिवाय, जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली. या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीने ही कर्जमाफी अपुरी असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? याबाबत निकष सांगितले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मी केली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेचं होणार नाही, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं सोसायटीची कर्जमाफी होणार नाही. आम्ही दोन लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे असे कोणीही दिलेलं पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे हा आहे की, कर्जमाफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत. 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता समिती या सगळ्यावर काम करत आहे. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे देखील त्यांनी सांगितले.

Loan Waiver : कोणते शेतकरी पात्र ठरणार? 

– दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी.

– ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.

– 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.

– नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold-Silver Price Today: एकीकडे नरेंद्र मोदींचे आवाहन, दुसरीकडे सलग दोन दिवस सोन्याचे दर घसरले

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण

तर त्याच सेकंदाला उडवून टाकणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने खळबळ; इराण मोठ्या संकटात!

Suvendu Adhikari PA : दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे पोहोचले?

सगळा त्याग जनतेने करायचा आणि मोदी फक्त… राहुल गांधी म्हणाले हा त्यांच्या अपयशाचा…

Todays Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर, तब्बल इतक्या..