जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्दजवळ महामार्गावर टायर फुटल्याने भीषण कार अपघात झाला. लग्नाहून परतणाऱ्या क्रूझर गाडीला टँकरवर धडक बसली, यात नववधूसह ३ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जळगावमधून एक अतिशय भीषण आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने झालेल्या या कारअपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या मृतांमध्ये, नुकतच लग्न झालेल्या एका नववधूचाही समावेश असल्याच माहिती समोर आली आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
हाताची मेहंदीही सुकली नाही, अपघातात नववधूने गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात च्या वापी येथून लग्नाचं वऱ्हाड घेऊन अकोला येथे ही क्रूझर कार जात होती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर असतानाच या धावत्या क्रूझर कारचं टायर अचानक फुटलं आणि ही कार त्या रोडलगत उभ्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. अतिशय भीषण अशी ही धडक होती. लग्न झाल्यानंतर नववधूला परत घेऊन येताना जळगाव मधील वराड गावाजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जिचं नुकतंच लग्न झालं अशा नववधूचाही मृतांमध्ये समावेश असून त्यामुळे सगळेच हळहळले. नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे असून तिघेही एकच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात आणखी 6 जण जखमी असून लहान मुलाची प्रकृती गंभीर आहे.

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
दुसरीकडे बुलढाण्यात एक दुर्दैवी घटनाघडली आहे. बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथील चेतन सोळंकी या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा बस स्थानकात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गिरडा गावात शोककळा पसरली आहे. चेतन हा पोलिस भरतीची तयारी करत होता, छत्रपती संभाजीनगर येथे त्याने तसा प्रयत्न ही केला असून मैदानी चाचणीत तो खरा उतरला असून लेखी परीक्षा बाकी होती. काल संध्याकाळी सायंकाळी चेतन हा बुलढाणा वरुण धाड ते मढ या एस टी बसमध्ये जाण्यासाठी चढत होता, मात्र गर्दी असल्याने तोल जाऊन तो बसच्या चाकाखाली आली. त्याला गंभीर अवस्थेत त्याला खाजगी रुग्णालयात भरती केले असता प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला . या घटनेमुळे चेतनच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे . अतिशय गरीब घरातील चेतन विद्यार्थी असल्याने होतकरू होता अशी माहिती ग्रामस्थानी दिली. शासनाने त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा ग्रामस्थानी केली आहे.
















