टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhanparishad Election 2026 Shivsena: विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंनी दोन मोहरे निवडले, पण शिवसेनेतूनच विरोध, बच्चू कडूंसाठी नेत्याची ‘ही’ महत्त्वाची अट

Follow Us:

Vidhanparishad Election 2026 Shivsena: विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ हे 57 इतके आहे.

Vidhanparishad Election 2026 Shivsena: येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान संपल्यानंतर राजकीय वर्तुळाचे सर्व लक्ष विधानपरिषद निवडणुकीवर (Vidhan Parishad Election 2026) केंद्रित झाले आहे. या निवडणुकीच्यादृष्टीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) सध्या वेगवान हालचाली सुरु आहेत. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उमेदवार म्हणून विधापरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची नावे अंतिम केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. (Maharashtra Politics news)

विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ हे 57 असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते इच्छूक असून त्यामुळे आता नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्याच नावाला पक्षातून मोठ्याप्रमाणात विरोध सुरु झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे यांच्या नावाला शिवसेनेतील काही मंत्री आणि नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेत ज्याप्रमाणे ज्योती वाघमारे यांच्या रुपाने नवा चेहरा देण्यात आला, तोच निकष विधानपरिषद निवडणुकीत वापरावा, अशी पक्षातील काही नेत्यांची मागणी आहे. तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय, असा सवाल अनेक नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी द्यायचीच असेल तर त्यांच्यासमोर एक अट ठेवावी. बच्चू कडू यांना त्यांची प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करण्यास सांगावे, असा प्रस्ताव शिवसेनेतील काही नेत्यांनी मांडला आहे. यावर दोन्ही बाजूने पुढे कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळते. मात्र, नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन्ही नावांना शिवसेनेतून प्रचंड विरोध असल्याचे कळते. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिवसेना विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार, हे समोर येईल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी