टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

परफेक्ट मागणी : नोटांवर हवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

Follow Us:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो लावण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर देशातील विविध भागातून नोटांवरील फोटोंबाबत वेगवेगळ्या मागण्या सुरु झाल्या आहेत.
यात आता भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नोटांवर मराठी साम्राज्याचे प्रतिक छत्रपती शिवरायांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी दोनशे रुपयांच्या नोटेचा फोटोशॉप केलेला फोटोही पोस्ट केला आहे.
राणे यांनी फोटो ट्विट करत म्हटले की, हे परफेक्ट आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी दिल्लाचे आमदार अरविंद केजरीवाल हे यातून हिंदु कार्ड खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या फोटो छापावा, अशी मागणी केजरीवालांनी केली होती.
यातून अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी येत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन थांबण्यासही मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. केजरीवाल्यांच्या या मागणीनंतर भाजपतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
भाजपने म्हटले की, केजरीवाल आपल्या सरकारच्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, केजरीवाल यांनी जे काही सांगितले ते त्यांच्या यू-टर्न राजकारणाचा आणखी एक विस्तार आहे. यातून त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार