टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शाब्बास रे पठ्ठया! ईशानचा डबल धमाका : दहा षटकार, चोवीस चौकारांसह 210 धावांची तुफानी खेळी

Follow Us:
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चितगाव येथे सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताकडून इशान किशनने द्विशतक झळकावले. त्याचवेळी विराट कोहलीने शतकी खेळी खेळली. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय बांगलादेशी गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि सलामीवीर शिखर धवनला स्वस्तात तंबूत पाठवले. धवनला केवळ ३ धावा करता आल्या. पण त्यानंतर कोहली आणि इशान यांनी बांगलादेशी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. 
एका टप्प्यावर भारत ४५० पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते, परंतु हे दोन्ही फलंदाज ६ षटकांच्या अंतराने बाद झाले आणि इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यामुळे टीम इंडियाला अखेरपर्यंत ८ गडी गमावून केवळ ४०९ धावांवरच समाधान मानावे लागले.
विराटने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ११३ धावा केल्या तर इशानने १३१ चेंडूत २४ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, एबाबत हुसेन आणि शकिब अल हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट