पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक पार पडली होती. आज मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 जागांवर आपचा विजय झाला आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय झाले आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपचं वादळ आल्याचं पहायला मिळत आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. तर काँग्रेस आणि आकाली दलाचा देखील मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे की, अजूनही पंजाबमध्ये आपची जादू कायम आहे. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.

पंजाबमध्ये या निवडणुकीपूर्वी भाजपने पक्षात काही मोठे बदल केले होते. केवलसिंह ढिल्लो यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपला आशी आशा होती की, प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा दिल्यानं त्याचा पक्षाला फायदा होऊ शकतो. केवलसिंह ढिल्लो हे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतील, विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. मात्र पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचं पहायला मिळत आहे. या निवडणुकीत आपचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे, तब्बल 680 पेक्षा जास्त जागा आपने पंजाबमध्ये जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानवं लागलं आहे. काँग्रेस आणि आकाली दल देखील आपच्या या वादळात उडाले आहेत.
दरम्यान राजकीय तज्ज्ञांच्या मते पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला भाजपचा पराभव हा भाजपसाठी केवळ एक इशारा नसून विधानसभा निवडणुकीपूर्वी धोक्याची घंटी आहे. पंजाबमध्ये स्थानिक मुद्दे हे राष्ट्रीय मुद्द्यांवर भारी पडल्याचं दिसून येत आहे. भाजपला अजूनही पंजाबमध्ये पुरेसा जनाधार नसल्याचं या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आप हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. आपने प्रचंड यश या निवडणुकीमध्ये मिळवलं आहे.















