टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राज्यातील उद्योगधंदे कुणामुळे गुजरातला गेले?

Follow Us:

फॉक्सकॉनसह टाटा-एअरबस या प्रकल्पांसह आणखी दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. याशिवाय सत्ताधाऱ्यांनी हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या शासनकाळातच गुजरातला गेल्याचा दावा केला होता. परंतु आता राज्यातील प्रकल्प कुणामुळं आणि कोणत्या कारणांमुळं महाराष्ट्राबाहेर जात आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन-तीन प्रकल्प कुठे गेलेत, हे माहितीच्या अधिकारातून समोर आलेलं आहे. आता ते कुणामुळं गेलेत, कधी गेलेत?, हे सुद्धा लवकरच समोर येणार आहे. राज्यातील उद्योगधंदे कुणामुळं बाहेर गेले, हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडलेलं आहे.
मोदी सरकार हे राज्य सरकारच्या पाठिशी असून विकासासाठी १४ हजार कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मोदी सरकार राज्याच्या विकासाला एक रुपयाही कमी करत नसून आमच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात नवे औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळं राज्यातील लाखो तरुणांना फायदा होणार असल्याचं शिंदे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

मोठी बातमी! युद्धविराम होताच चीनचा भारताला मोठा धक्का, पुन्हा पाठीत खंजीत खुपसला, संतापजनक कृत्य

उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त

Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या… हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

क्षणात धमाका होऊन जहाजाचे तुकडे…होर्मुझमध्ये इराणने कोणत्या माईन्स पेरल्या; वाचून चकितच व्हाल!

BJP News : 28 वर्ष पक्ष कार्यालयात शिपायाचं काम केलं, त्या व्यक्तीला भाजपने दिलं निवडणुकीच तिकीट