शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली होती. आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचं बोललं जातंय. त्याला कारणही तसंच आहे.
सम्बंधित ख़बरें

वीस वर्षांनी जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना ‘मनसे’ कानमंत्र!

“शिवसेना, राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षेमुळे फुटले” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट, राज ठाकरेंनी दिले महत्त्वाचे आदेश

आमदार राजू खरे यांच्या त्या जाहिरातीची एकच चर्चा; आषाढीचा उपवास कोणत्या पक्षात सोडणार?

राज अन् उद्धव ठाकरेंच्या मुलांची शाळा काढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संदीप देशपांडेंनी अंगावर घेतले; म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री…
राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेल्याचं सांगितलं जात असलं तरी पवार अचानक पाच दिवसांपासून नॉट रिचेबल झाले. गेल्या पाच दिवसांपासून पवार कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पवार शिर्डीच्या शिबिरातूनच 4 नोव्हेंबर रोजी आजोळी देवळाली प्रवराला गेल्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही.
खरं तर पवार अद्यापही देवळाली प्रवराला पोहोचलेच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही स्वतः शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत हेलिकॉप्टरने येत हजेरी लावली होती. परंतु त्या राज्यस्तरीय शिबिरानंतर अजितदादा कुठेही दिसलेले नाहीत. नेहमीच मीडिया आणि बातम्याच्या गराड्यात राहणारे पवार अचानक पाच दिवस गायब झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आले आहे.