टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

एकच नंबर! आता घरीच पिकवा विषमुक्त भाजीपाला ; सोलापुरात कार्यशाळा

Follow Us:
असे म्हटले जाते की,  भाजीपालांमधून सायलेंट विष पसरविण्याचे काम होत आहे. यामुळेही कदाचित माणसांचे आयुष्य घटत असेलही. तसेच दिवसेंदिवस भाजीपाला दरातही वाढ होत असून यामुळे सामान्य कुटुंबासह, मध्यम वर्गातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. विषमुक्त भाजीपाला लागवड कशी करावी, आणि माती विरहित भाजीपाला लागवड बाबतीतही याची सविस्तरपणे  माहिती व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे अशी माहिती सखी संघमच्या सचिवा ममता मुदगुंडी यांनी दिली. 
सोलापूर शहरात जवळपास ५०० कुटुंबे असतील परसबागेची लागवड करणारे. ‘अनेक कुटुंबांनी दररोज भाज्यांमध्ये लागणारे घटक लागवड केली तर उत्तमच’. सोबत पैशांचीही बचत होईल. यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, टमाटे, कांदा, यासह इतर अनेक प्रकारच्या हिरव्या भाजीपाला आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे लागवड कशी करावी हे जाणून घेण्यासाठी माती विरहीत बाग प्रेमीचे संयोजिका सौ. ममता बोलाबत्तीन या माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. 
चला.. जाणून घेऊया..  
या उपक्रमात महिलांनी जास्तीत संख्येने ‘कन्ना चौक, चौडेश्वरीदेवी मंदिर पाठीमागे, चौडेश्वरी पतपेढी समोर, डॉ. मेतन हाॅस्पिटल शेजारी’ येथे उपस्थित रहावे, तसेच महिलांनी अधिक माहितीसाठी (9175988940) या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे, उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा ममता मुदगुंडी, सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, सहकार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, खजिनदार प्रभावती मद्दा आणि सहखजिनदार ममता तलकोकूल यांनी केले आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट