प्राथमिक माहितीनुसार कोक पाटीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमधील कुटुंबीय हे धोंडे जेवणावरून येत होते. याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.
देशात वाहन अपघातात रोज अनेकांचा मृत्यू होतो. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे नेहमी सांगितले जाते. परंतु तरीदेखील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तसेच रस्ते खराब असल्याने अपघाताच्या या घटना घडतात. अशीच एख हृदयद्रावक घटना घडली आहे.
1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील परभणी-जिंतूर महामार्गावर एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2 / 5
प्राथमिक माहितीनुसार कोक पाटीजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमधील कुटुंबीय हे धोंडे जेवणावरून येत होते. याच वेळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.
3 / 5
या अपघातात नातू, आजोबा आणि आजीचा यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
4 / 5
बसने धडक दिल्यामुळे दुकीचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय होते? याविषयीची नेमकी माहिती समोर आलेली नाही. परंतु या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.