टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

देशावर मोठं संकट आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. नागरिकांना सुरक्षित स्थळी पुढील काही तास राहण्याच्या सूचना दिल्या. पुढील काही तासात पाऊस मोठा धुमाकूळ घालताना दिसले. याबाबतच थेट इशारा देण्यात आला.

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

देशात मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच पावसाने थैमान घातले. जवळपास राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यातील पाऊस असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये अतिमुसळधार पावसासह चक्रीवादळ धुमाकूळ घातला. मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. विजांच्या कडकडाटासोबतच ताशी 90 किलो मीटर प्रतितास वेगाने वादळही असेल. पुढील 8 आणि 24 तास या राज्यांसाठी धोक्याची असणार आहेत. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. यादरम्यान नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहवे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्यात.

देशात मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच सतत पाऊस सुरू आहे. मान्सून दक्षिण भारतात दाखल होत असल्याने, अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य यासोबतच ईशान्य भागातील काही अधिक भागांमध्ये आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे.

5 जूनपर्यंत पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस, गारपीट आणि ताशी 70 किलोमीटर वेगाचे वारे वाहू शकते. या नवीन पश्चिमी प्रणालीमुळे जम्मू आणि काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.  देशासाठी पुढील 3 ते 4 दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो.

मॉन्सून थोडासा लेट होताना दिसत आहे. मात्र, मॉन्सून लेट होत असला तरीही पाऊस सुरूच आहे. मॉन्सून देशात दाखल झाल्यानंतर पावसाचा वेग वाढेल. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सुरूवातीपासूनच देशात पावसाचा जोर असेल. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या घटनेत 31 जणांचा जीव गेला. चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला, ज्याने मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसासह वादळाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार