टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?

Parrot : पोपटांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान केल्यानंतर, वर्ध्यातील एका शेतकऱ्याने 10 वर्षे कायदेशीर लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

अन् पोपट ठरला वन्यप्राणी... देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?

वर्ध्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील डाळींबाचे पोपटांमुळे नुकसान झाले होते. हिंगणी येथील शेतकरी महादेव डेकाटे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यात त्यांनी पोपटांमुळे बागेचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता दहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पोपटामुळे डाळिंब बागेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोपटांनी केले पिकांचे नुकसान

शेतकरी महादेव डेकाटे यांचे वकील अभिजित सांभरे यांनी म्हटले की, डाळिंबाची लागवड केल्या तर 2016 हे प्रकरण आहे. जंगली पोपटाच्या थव्याने त्यांच्या डाळिंब फळांचे आणि फुलांचे नुकसान केले होते. त्यावेळी वनविभाग आणि जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्यात आले होते. मात्र जंगली पक्षांनी केलेल्या नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही असं कारण प्रशासनाने दिले होते. त्यानंतर शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली होती.

शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

आता या प्रकरणावर निकाल देताना नागपूर खंडपीठाने म्हटले की, वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था आहे. तसेच वन्य पक्षी प्राणी वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अंतर्गत संरक्षित असेल आणि त्यांना वन्यजीव संरक्षणाचे नियम आणि फायदे लागू होतात. अशा परिस्थितीमध्ये पक्षांनी नुकसान केल आहे, या बाबीसाठी नुकसान भरपाई नाकारू शकत नाही असं म्हणते शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोपट हा सुद्धा आता वन्यप्राणी ठरला आहे.

वन्य प्राणी आणि पक्षी यात भेद करता येणार नाही

कोर्टाने शेतकऱ्याचे हित आणि वन्य प्राण्याबाबत असलेल्या नियमांचा विचार करत वन्य प्राणी आणि वन्य पक्षी यात भेदभाव करता येणार नाही असे म्हटले. वन्य पक्षाने हे जर पिकाच नुकसान केलं आहे. तर त्याला सरकारने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. त्यामुळे दोनशे रुपये प्रति झाड याप्रमाणे 200 झाडासाठी शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी… रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..

Horoscope Today 28th April 2026 : नोकरी-व्यवसायात मोठा बदल! तुमच्या राशीवर काय परिणाम ? वाचा प्रत्येक राशीचं भविष्य

विधानपरिषद निवडणुकीबाबत भाजपच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, दिल्लीतून वरिष्ठांचा एक मेसेज अन् निम्म्या उमेदवारांचा पत्ता कट

मोठी बातमी! इराणचा अमेरिकेला दणका, थेट मारली मोठी बाजी, जोरदार वाद, संयुक्त राष्ट्र..