महाराष्ट्र-कर्नाटकामधील सध्याचा वाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदा नव्हे, दोन-तीनदा त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. आज महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील जनता संयम राखून आहे. हा संयम सुटू नये याची काळजी कर्नाटक व केंद्र सरकारनं घ्यायला हवी.
सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासात थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल. उद्रेक झाला तर त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जबाबदार असतील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावलं आहे.
बेळगाव जवळच्या हिरेबागवाडी इथं कर्नाटकातील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
बेळगाव जवळच्या हिरेबागवाडी इथं कर्नाटकातील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार
आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर




