भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना आज शेर ए बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. यातील दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला धक्का बसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला चेंडू लागला आहे. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. दुखापत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. मैदानातून परतत असताना त्याच्या अंगठ्यातून रक्त येत होते.
हा सर्व प्रकार दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडला. मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर अनामूल हकने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला, तिथे रोहित फिल्डिंगसाठी तयार होता. मात्र, चेंडू त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच खाली होता.
त्यामुळे त्याने हात चेंडूच्या खालच्या दिशेने पुढे केले, तेवढ्यात चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. अशाप्रकारे रोहित झेलही पकडू शकला नाही आणि त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेल्या हाताला धरून तो लगेच मैदानातून निघून गेला. रोहितला एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या

Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार

मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

राज आणि उद्धव पुन्हा आले एकत्र, यावेळेस काय ठरलं निमित्त? जाणून वाटेल आश्चर्य!