टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पाणी द्या नाही तर थेट कर्नाटकात जाऊ

Follow Us:
सीमावाद न्यायालयात प्रलंबित असताना आता ४० गावांचा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे व या प्रस्तावावर कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत थेट कर्नाटकमध्ये विलीन होण्याचा इशारा दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा अल्टिमेटम जत तालुका पाणी कृती समितीने दिला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र मधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे. इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत? असा सवाल समितीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाही तर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, असा इशारा समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिला आहे. याबाबत आज शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 एप्रिल 2026 | सोमवार

इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Pandharpur Crime News: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा उघड केला बनाव

मोठी बातमी ! होर्मुज स्ट्रेटमध्ये आजपासून नाकाबंदी, ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला बसणार फटका