देशभरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच असून क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताची देशभर चर्चा सुरू असताना गुजरातमध्ये एक दुर्घटना घडली आहे.
गुजरातच्या नवसारी येथे काल रात्री कार व बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बस अहमदाबादेतील एका कार्यक्रमानंतर मुंबईच्या दिशेने येत होती.
तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडून उलटलेली कार दुभाजक ओलांडून बसच्या समोर आली आणि बसला धडकली. यात कारमधील सर्व ८ जण जागीच ठार झाले, तर बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भरूचमधील एका फार्मा कंपनीचे कर्मचारी आहेत.
संबंधित बातम्या
हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल
सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला आणखी किती शतके हवी आहेत?
RBI Repo Rate: आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा EMI कमी होणार
मोबाईल चार्जरवर दिलेल्या ‘या’ अंकांचा नेमका अर्थ काय, तुम्ही वापरत असलेला चार्जर खरंच सुरक्षित आहे का?
तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…




